ह्या जगात सारंच आहे, नाही असं काहीच नाही. तरी माणूस साऱ्याच गोष्टींचा अंगीकार करून जगू शकत नाही. त्याला जेवढ्या गोष्टींची गरज आहे तेवढ्याच अंगीकारून तो आनंदाने नांदू शकतो. आणि शक्याशक्यतेच्या दृष्टीने बघता हाच न्याय आहे. फक्त दोनच गोष्टींनी साकारलेलं हे जग ...यात कोणत्या एकाशी सलगी केली की दुसऱ्याशी विलग व्हावेच लागते. तसे दोन्हीन्च्यामध्ये राहून स्वर्णमध्य साधत माणूस आपले जगणे सुकर करू शकतो. परंतु त्यात दुटप्पीपणाचा आरोप भाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या बुद्धीच्या, मनाच्या, विचाराच्या अनुरूप असणाऱ्या गोष्टींचा स्वीकार न्यायाचा ठरतो. निक्या सत्वामध्ये मोडणाऱ्या, स्वतःला स्वास्थ्यकारक ठरणाऱ्या, मनाची घुसमट न करणाऱ्या बाकी फोलपट, अप्रिय वजा केल्या जाणाऱ्या बाबी अनुकरणीय ठरायला हव्यात! मानवतेला उजागर करणाऱ्या नीतीमूल्यांचे समर्थन करणे केव्हाही सत्कार्यच ठरू शकते, कोण्या सीमित व्यवस्थेला, वर्तुळप्रीय भावनेला, स्वश्रेष्ट-परदुष्टपणाच्या विचाराला थारा देणाऱ्या मानसिकतेला ‘विकृती’ हीच संज्ञा योग्य म्हणायला हवी. जीव हा कोणताच अकर्मी असू शकत अनाही.