शुक्रवार, १८ मे, २०१२

कुठवर राखावे भोळेपण?



देव-देवतांच्या आधारेफलज्योतीष्याचे बळ सारे|
दुकान थाटून बसले कोणीस्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|
गुलाम होईल ऐशा ज्ञानाजनतेमध्ये पसरविताना|
लाज मुळी मानसी न काहीफक्त हित अपुलेच पाही|   

किती आजवर केले भाकीतवेळ ती येता बसले झाकीत|
भाकीत खोटे ठरते जेव्हाकरी सारवा-सारव तेव्हा|
भीती कशाला जनी पसरवीस्वतःस का ते असे घसरवी|
खोटे-नाटे सांगून येथेघरी तुंबडी भरून नेते|
मुर्ख जाणोनी जनतेला कादेत चालले सदाच धोका|

सुज्ञ येथली जनता होतासुख-दुःखाच्या करती बाता|
त्या आधारे बसते घोकीतश्रद्धा अपुली असते राखीत|
शब्दमय जंजाळाचे तेजनतेवरती जाळे टाकते|
निराश इथली भोळी जनताशरण जातसे हा हा म्हणता|
अज्ञानाची हीच परिणतीअशी घडविते सदा अवनती|

व्हा व्हा जनहो जागे आतानको राहणे मागे आता|
कुठवर राखावे भोळेपणस्वत्व आपुले इथे गमावून|
अस्मितेची कास धरा रेबाणेदार हे जीणे करा रे|
कशास पोथी हवी खुळी तीजी देते जीवनाला गळती|
आणिक त्यांचा कशास मक्ताशोषित जाईल तुमच्या रक्ता|

सोडा त्यागा खुळेपणाशीसप्रेमाने जगा जीवाशी|
स्थान अंध जर विश्वासालाखरे निमंत्रण ते ऱ्हासाला|
हाती येत असे कर्माचे फळनसे कोणते दैवाचे बळ|
मर्यादेने सदाच वागाविवेक राखा अखंड जागा|
नको नको ती व्यर्थ गुलामीमानवतेला द्या ना सलामी|

कास धरा या विज्ञानाचीआणिक सुंदर शिव ज्ञानाची|
नको कोणती निर्मम आशाडावबाज जी सुंदर भाषा|
या जपण्याशी समता प्रेमळविषमतेचा सारून तो मळ|
नीच कुणाशी जाणू नका रेदूर करा जी बात फुका रे|
वैभव मग इथले ते सारेया सगळे जण लुटावया रे|

-मनोज बोबडे (व्हीलचेअरया कवितासंग्रहा मधून)

वर्षा ऋतू पर हिन्दी बालकविता

  प्रतीकात्मक इमेज  वर्षा ऋतू वर्षा ऋतू आया है बारीश ने गीत गाया है नभ के आंगण मे देखो काली काली छाया है चल राजू चल पिंटू चल भिगते है पानी म...