पोस्ट्स

ऑगस्ट, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सगळेच मनाचे साथी

सगळेच मनाचे साथी मी कुणास ठेऊ नावे मज उगा दोष दे त्यांना मी कशास शोषित जावे ते गावे गातच जावे समतेचे गीते सुहाणे प्रेमाची फेड प्रेमाने नच मोल ठेवती नाणे ही भोगून घ्यावी सारी सुख-दुःखे आळीपाळी सप्रेमच जगणे आहे दुनियेची तऱ्हा निराळी हिरवळ नात्यची अन् सुमनापारी मैत्री गोड दरवळेल जपता सारा हर्षाचा गंध अजोड मिठास रसनेला ती अंतरात मद भरलेला तू अशा  नीती साठी रे हा कशास देह झीजविला न्यायाची धरणे बुज साहणे न अन्यायाला समतेचे देणे घेणे हे सौख्यच दे हृदयाला तू ये हृदयाशी माझ्या कर बातचीत स्नेहाची भरभरून देऊ प्रीती करू दुनिया मानवतेची            मनोज बोबडे 

कारण कळले की भीती उरत नाही....

      ‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाचे अपरिमित् नुकसान होत असते, मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना, ते होत असते हा प्रत्येक जीवाचा परखड असा अनुभव असतो. हे कोणतीही प्रामाणिक व्यक्ती नाकबूल करणार नाही. भीती ही कोणत्याही स्वरुपाची असू शकते. ‘अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वा झाल्यामुळे वाटणारी परीक्षेची भीती.’ अवांतर संपत्ती घरी बाळगल्यामुळे चोरांची वाटणारी काल्पनिक भीती.’ दोरीला साप समजल्यामुळे वाटणारे भ्रमात्मक भय.’ ‘अंधाराचे भय वाटणे.’ ‘ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवल्याने भुताचे भय वाटणे.’ इ. प्रकारचे भय माणसाला नुकसानदायकच ठरत असते. या भयाने होणारा विनाश आपल्याला प्रत्यक्ष् जाणवत नसला तरी अप्रत्यक्षपणे आपला प्रभाव गाजवीतच असतो. हृदयाच्या नसांना कमजोर करत कोणत्याही बाबींवरील उपचारासाठी राबणाऱ्या विचारांना लुळे करण्याचे सगळे श्रेय ही भीतीच घेऊन जात असते. म्हणूनच तिच्या परिणामाची कल्पना असणाऱ्यांनी तीविषयी तारतम्य बाळगलेले कधीही चांगले. भीती वाटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ती वाटली अ

नारा

बंध येथे जागताना ठाम थारा पाहिजे दो मनाची वाहणारी एक धारा पाहिजे लग्न गाठी जोडल्या जर चालताना वाट ही मी तुझा नि तूच माझी हाच नारा पाहिजे मनोज  बोबडे... 'व्हीलचेअर'मधून...

काही श्लोक

मला लागला नाद मानव्यतेचा गडे वाद सरला खुळ्या संचिताचा    अता राहणे गोड साध्या ठिकाणी सदा खोदणे आपुल्या सत्व खाण नको भेद-भावा इथे स्थान देऊ नको कोणत्याही अन्यायास साहू नको रे अडू शब्दराशीमध्ये तू रुचेना मन ते नको गीत गाऊ कुणा हीन मानू नको सुद्न्य बा रे इथे सर्व कच्चे जणांचे किनारे कुणी आगळे नी कुणी वेगळाले सदा माणसे शोधताती सहारे               कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी कुणी धन्य  येथे कुणी त्या ठिकाणी मजा वाटते हीन म्हणता कुणाला रुचे साम्यता ही कुणाच्या मनाला  -मनोज बोबडे...'वेध अम्बराचा' मधून 

वेगळेपणाचं वैशिष्ट्य

          सृजनात्मक प्रकृती कुणाला प्रिय नसते? ज्याला नसते, तो रसिक म्हणता येत नाही. त्याच-त्यापणात अडकून असणाऱ्या कृती रसिक मनाला डबक्यासारख्या भासत असतील तर नवल ते काय?  तिच्यासारखीच ती असणं म्हणजे तिच्या कृतीचं महात्म्य, तिचा गोडवा हा अप्रतिम असणं आहे. वेगळ्या सामर्थ्याची घडणच तिचं वेगळेपण टिकवून असते. मग तिच्या गुणाचं प्रमाण किती हा भाग अलाहिदा! स्वतंत्र अस्तित्व लेवून असलेलाच आविष्कार, डोळ्यांना, रसिक मनाला सुखावह वाटत असतो. कारण त्या निर्मितीकडे बघताना तो आधीच बघितल्याचा निरस भाव आपल्या लोचनी असत नाही. उलट त्याकडे बघताना एक चमत्कृतीपूर्ण -नजर आपली साथीदारीण झालेली असते. आणि हाच अचंबा आपल्याला उदात्त, उत्तम असा आनंद देणारा ठरतो. फक्त ती रसिकता व वेगळेपणाचं सामर्थ्यही उरी नांदायला हवं!           डॉ. इकबालांचा एक 'शेर' आहे...                            जम्हुर्हियत तर्ज  हुकुमत है यारो जिसमे                             बंदो को गिना जाता है, तोला नाही जाता| इकबालांनी असं जे म्हटलं आहे ते उगाच नव्हे! कोणत्याही प्रतिभेला तोलण्याची गरज ती काय? तिची स्वतंत्रपणे माप

हिरवा प्रकाश

रंगीत हे मेघ | नभाच्या अंगणी | ओलीचिंब गाणी | पावसाची || अफाट अनंत | धरणी आकाश | हिरवा प्रकाश | जिथे-तिथे || आनंद सर्वत्र | कणकणवासी | नाते हे प्रेमाशी | जुळलेले || निर्मळ, प्रेमळ | अंतरंग जे-जे | मनाशी पाहिजे | माझ्या तेच || हिण तत्व सारे | प्रस्थापण्यासाठी | करी उठाउठी | वीट त्याचा || माणूस म्हणोन | मनो-मनी नांदू | काळजाला सांधू | माणसाच्या || होईल हिरवी | कंच दाट मने | गाऊ चला गाणे | पावसाचे || -मनोज बोबडे