पोस्ट्स

ऐक जरा साजणे...

ऐका जरा साजणे ये जरा समीप ये  दाव काळजास माझ्या लाघवी ते रुप ये  संपला तो शोध आता संपली आहे प्रतीक्षा  उभय काळजास करू परस्परांनुरुप ये  नव्या जगात जाऊया हात हाती घेऊनि  नव्या नभी भरारण्या घेऊ चल झेप ये  हव्याहव्याशा सखे तुरुंगवासाची सजा  प्रीत गुन्ह्याची सदा भोगू जन्मठेप ये कुठे हे जग पाहणे पून्हा जीवास लाभणे  ह्या नव्या जगातला आनंद घेऊ खूप ये -मनोज बोबडे (2005)

गावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू!

‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते सांगायचे झाले तर या संग्रहातील प्रत्येक कडवे हे दुसऱ्याशी कडीप्रमाणे जुडलेले आहे. एक कडवे वाचले की, ते विचार करायला बाध्य करतेच. मग दुसरे मला वाच म्हणून खुणावत राहते. वाचीत जातो तसतसे मन रोमांचित होत जाते. चिंतानाधीन होत जाते. आणि आपण आपल्याच गावाच्या दुनयेत विहार करायला लागतो. हीच या ‘गावसूक्ताची’ खासियत आहे. त्यातील ओळनओळ मनस्पर्शी झाली आहे. पहिल्यापासून तर शेवटच्या ओळीपर्यंत साचेबद्ध असणारा हा ग्रंथ बाहेरून जेवढा सुंदर आहे, त्याहून कितीतरी पटीने तो आतून काव्यसौंदर्याने नटला आहे. गावाचं अस्सल आणि विदारक चित्रण करणारा तसेच मनाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा हा संग्रह सर्वच बाबतीत वैविध्यपूर्ण आहे. ही झाली ‘गावसूक्ताच्या’ कवितेतील काव्याची उजवेपणा. रचनेच्याही आगळेपणाविषयी आवर्जून बोलावे अशीच ती आहे. सर पावसाची येता लागे धरेला चाहूल आत धडपडे मुल. ही अष्टाक्षरी नव्हे, चारोळी पण नव्हे, अभंगही नव्हे, हायकू तर नव्हेच नव्हे. मग हा प्रकार आह

कॉम्रेड पानसरे

पानसरे तुम्ही। असे काय केले। जिवानीशी गेले। संपुनिया।। जगावया येथे। करुनिया तर्क। व्हावया सतर्क। शिकविले।। सर्वहारा वर्ग। आपला तू केला। संदेशही दिला। जगण्याचा।। जाती-धर्मातली। तेढ संपवाया। झिजला तू राया।आजीवन।। कोण तो शिवाजी। कसा नि कोणाचा। सांगून तू वाचा। फोडलीस।। अठरापगड़। जाती-जमातीचा। असा शिवाजीचा। इतिहास।। अशा ज्ञानामुळे। जात्यांधाचे हित। आल्याने गोत्यात। भांबावले।। आणि तू गोविंदा। दीनांच्या कारणे। केली आंदोलने। कितीतरी।। भांडवलदार। हेही तुझ्यावर। वाकड़ी नजर। ठेवलेले।। ह्या ह्या वृत्तिनेच। प्रकार आखुन। तुझे सुज्ञ प्राण। हिरावले।। सत्य, न्याय, सख्य। ह्यासाठी घातली। हयात सगळी। पानसरे।। परि नाही चिंता। एका बिजातून। हजारो उगुन। बीजे येती।। -मनोज स. बोबडे

वऱ्हाड भाज्यांचे

इमेज

लक्षण विजय वीरांचे

नकोच धरणे इर्षा, मत्सर पाहता यश इतरांचे स्वतःस जिंकीत जाणे हे लक्षण विजय वीरांचे || जिद् मुंगीची अंगी बाणून गरुड नजर ती स्वतःस मानून क्रमून कणकण अंतर खडतर झिजवून काया सदा खरेतर ध्येय गाठणे तयांचे || नसे कुणाशी तुलना आणिक झपाटणे हे त्यांचे 'टॉनिक' हवे मना ते धरण्यासाठी मात स्वतःवर करण्यासाठी धडपडणे ते करांचे || सदोदित ते मनास बोले 'तुझियासाठी अशक्य कुठले? कर कर कर कर सुरुवात ती जमेल तुजला हवी बात ती' मंत्र-जाप हे शूरांचे || -मनोज बोबडे

मक्तेदारी

विश्वास जयावर केला भारी त्याने केली हरामखोरी सोपविले ज्याच्यावर जीवन ते करते असली गद्दारी साम, दाम, भेदावर मेले लुटू लागले जनता सारी शब्दाच्या खेळावर नुसते सुंदरता करते बाजारी धर्माच्या नावावर निव्वळ भारतास केले आजारी जिंकाविती साधारण कोणी हीत रक्षति अपुले भारी मानवतेचा लेश न पुरता अशी कशी ही मक्तेदारी -मनोज बोबडे

सांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”

इमेज
जागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झालर भालावर बांधून, माणूस शाश्वत मूल्यांना मुठमाती देण्यात धन्यता मानतो. मानवी मनाचं उद्ध्वस्तीकरण प्रत्येकाच्या नजरेत सलत आहे. समाजाच्या स्तरिकरणाचा विचार केल्यास उच्च स्तराद्वारे निम्न स्तराचे शोषण होत आहे. उपेक्षितांच्या, वंचितांच्या जाणिवा चित्रकाराच्या कुंचल्याने लेणीरूप होतात तर कवीच्या शब्दाने महाकाव्य! ज्यांनी आयुष्याला तप्त तव्यावर शेकले असेल त्यांचा कलात्मक आविष्कार ‘आम आदमी’च्या संवेदनेचं प्रातिनिधिक रूप असत. उपरोक्त संदर्भात तादात्म साधेल असे समकालीन व्यवस्थाचित्र नाविन्यपूर्ण व समृध्द भाषाशैलीने कवी ‘किशोर मुगल’ यांनी ‘दिवस निरुत्तर येतो’ या कवितासंग्रहात अभिव्यक्त केले आहे.    कवी ‘किशोर मुगल’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक ‘चंद्रपुरी गझलकार’आहेत. ’एकावन्न कविता माझ्याही’ हा त्यांचा पूर्वप्रकाशित कवितासंग्रह! ’मराठी माय बोली’ कवितेच्या कार्यक्रमाचे एक सभासद. अलिकडेच ९ व्या मराठा साहित्य संमेलनात[चंद्रपूर] संमेलनाध्यक्ष बाबा भा