रिपोस्ट

कृतीचा दिसे पुढती अंजाम जेव्हा
नसावा अचंबा नसो नवल तेव्हा
करावे मनन वेडी चिंता हरावे
जळाकारणे रोप बहरून यावे

अतर्क्य परामानसी गुंतलेला
कुठे राखतो न्याय तो बंधुतेला
तयाला गमे धर्म उन्माद नीती
सले साम्य त्याला चळे गोड प्रीती                    

जिथे संशयाला नसे निमिष थारा 
तिथे ज्ञानवंता मिले हा किनारा 
सुचे प्रश्न ना, नच उभे तर्क राही
परीघापुढे ना फुले ज्ञान काही 

मनोज बोबडे..'वेध अम्बराचा' मधून.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हे असं आहे तर...

  सूर्य डोक्यावर चढल्याने देहछाया अस्तित्वहीन झाली होती. कोणत्याच सरळ रेषी वस्तू प्राण्यांना सावलीची सोबत उरली नव्हती. सावलीविना एकाकी असण्य...