शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

काही श्लोक


मला लागला नाद मानव्यतेचा
गडे वाद सरला खुळ्या संचिताचा   
अता राहणे गोड साध्या ठिकाणी
सदा खोदणे आपुल्या सत्व खाण

नको भेद-भावा इथे स्थान देऊ
नको कोणत्याही अन्यायास साहू
नको रे अडू शब्दराशीमध्ये तू
रुचेना मन ते नको गीत गाऊ

कुणा हीन मानू नको सुद्न्य बा रे
इथे सर्व कच्चे जणांचे किनारे
कुणी आगळे नी कुणी वेगळाले
सदा माणसे शोधताती सहारे  
           
कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी
कुणी धन्य  येथे कुणी त्या ठिकाणी
मजा वाटते हीन म्हणता कुणाला
रुचे साम्यता ही कुणाच्या मनाला 

-मनोज बोबडे...'वेध अम्बराचा' मधून 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विचारधन

  'धर्माविना विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आइन्स्टाईनचे उद्धृत फार उत्साहाने अनेकवार ऐकवले जाते; पण आइन्स्टाईनने हेही स...