मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

श्लोक

 


किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा

किती शब्द प्रमाण मानू तयांचा

इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली

कसा मान राखू अशा देवतांचा           

 

कुणा हीन मानू नको सुज्ञ बा रे

इथे सर्व कच्चे जनांचे किनारे

कुणी आगळे नी कुणी वेगळाले

सदा माणसे शोधताती सहारे

 

कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी

कुणी धन्य येथे कुणी त्या ठिकाणी

मजा वाटते हीन म्हणता कुणाला

रूचे साम्यता ही कुणाच्या मनाला

 

कृतीचा दिसे पुढति अंजाम जेव्हा

नसावा अचंबा नसो नवल तेव्हा

करावे मनन वेडि चिंता हरावे

जळाकारणे रोप बहरून यावे


-मनोज बोबडे


#सुविचार #विवेक #vlog #google #facebook #विचारधन #art #manojbobade #poetry #literature #साहित्यकला #humanity #instagram #लेखक #कवी #blog #सपोर्ट #shlok #काव्य #शब्द 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अतर्क्य परामानसी गुंतलेला

अतर्क्य परामानसी गुंतलेला कुठे राखतो न्याय तो बंधुतेला तयांला गमे धर्म उन्माद नीती सले साम्य त्याला, चळे गोड प्रिती                         ...