कुसुमास भाव मोठा
गंधास ना कहाणी
पद्यच श्रेष्ठ जेथे
काव्यास कोण मानी?
कृत्रिमता कशी ही
नांदावयास पाहे
टरफले हासती अन्
गाभा झुरून राहे
प्रतिभा उणी कशी ही
वाहे वेड्याप्रमाणे
कीर्तीस हपापल्यांचे
असती कैक बहाणे
-मनोज बोबडे ('परिमळ' या कविता संगहातून)
रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'...... कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था ---मिर्झा गालिब
कवी : एक बादशाह कवी काहीही बोलला तरी ते लालीत्याच्या, सौंदर्याच्या शिखरावर नेऊन ठेवतो. खोट्यातली खोटी आणि लहानातली लहान गोष्ट देखील सत्य ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा