शनिवार, ५ जुलै, २०२५

वर्षा ऋतू पर हिन्दी बालकविता

 

प्रतीकात्मक इमेज


वर्षा ऋतू


वर्षा ऋतू आया है

बारीश ने गीत गाया है

नभ के आंगण मे देखो

काली काली छाया है


चल राजू चल पिंटू चल

भिगते है पानी मे चल

बोट बनाते कागज की

और रेती के बंगले चल


चल बारीश से बात करे

दिनभर सारी रात करे

इस  झुलसाती गर्मी पर 

पानी का आघात करे


इस वर्षा के आने से

धरती के भिग जाने से

जंगल बन जाते है हरे

पानी को आजमाने से


-मनोज बोबडे


गुरुवार, ३ जुलै, २०२५

मराठी भाषा आणि अभंग

 

प्रतीकात्मक इमेज 


प्रश्न 


केली कोणी सांगा? मराठीची दैना l 

प्रश्न हा जाईना, मनातूनी ll 


बालकाचे मन, रमावयासाठी l 

असे द्यावे पाठी, ओझे त्याच्या ll


शाळेला प्रथम, सांभाळावे जरा l 

मग धडा खरा, शिकवावा ll


मातृभाषेलाच, आधी ते प्राधान्य l 

मग भाषा अन्य, सांभाळावी ll



-मनोज बोबडे

शनिवार, २८ जून, २०२५

 

प्रतीकात्मक छायाचित्र 

आत्ता जरा इथून पुढे


आत्ता जरा इथून पुढे झोकात चालू!

 वरिष्ठांच्याही योग्य त्या धाकात चालू!


 धाऊ पडू, पुन्हा उठू, रडू, हसू, गाऊ

 शंभरात, हजारात नाही लाखात चालू!


 जुनं ते सोनं म्हणू द्या म्हणतील त्यांना

 अस्सलता स्वीकारत व्यर्थ टाकत कात चालू!


 इथे आहे सगळेच, हाही चालू, तोही चालू 

 कोणाची नीती तर, कोणाची औकात चालू!


 कित्येक जण निवडतात स्वार्थपूर्तीचेच रान

 आपण तर मानवतेच्या, न्यायाच्या पिकात चालू!


-मनोज बोबडे (११ जाने २०१०)


बुधवार, २५ जून, २०२५

पाच लघुत्तर कथा

 छायाचित्र : सावंतवाडी पॅलेस 

   १) १० सेकंद

हा रस्त्याने जाताना तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत स्मित करत मनात सुखावत होता. जगातले सर्वांग सुंदर, कोमलकांत दृश्य बघून तिचेही मन कमालीचे संतोष पावले. ती अलौकिक प्रेम कहानी अवघ्या १० सेकंदातच समाप्त झाली, चारच पावलावर 'इतका वेळ का लागला ग?' हा तिच्या नवऱ्याचा प्रश्न दोघांच्याही कानात शिरला तेव्हा! 

२) प्रेम आंधळे असते

राधेचे कृष्णावर प्रेम होते, कृष्णाचे राधेवर. ह्या अद्वितीय प्रेमावर देशातल्या ८०% हून अधिक जनतेने प्रेम केले. प्रेम आंधळे असते, हे खरेच आहे. कारण पुराणेच म्हणतात, 'राधा कृष्णाची मामी होय.' हे ऐकले की भक्तांच्या कपाळावर अगणित आठ्या पडतात. 
३) युद्ध 

बंदुकी, गोळ्या, बारूद, ड्रोन, मिसाईल आदी अस्त्र, शस्त्र, क्षेपणास्त्रांचा वापर करत युद्ध छेडून जीवित हानी केली जाते. हे इतर दुश्मन देशासोबत घडत असते. पण देशांतर्गत आपल्याच माणसांसोबत जातीच्या, अस्पृश्यतेच्या, गरिबीच्या आधारावर शब्दांची अदृश्य शस्त्रे, अस्त्रे, क्षेपणास्त्रे वापरली जात त्यांच्या जगण्याची अपरिमित हानी केली जाते, तेव्हा हे कुणालाच दिसत नसते. 
४) सनातन सत्य?

हिचा फोन आला तेव्हा त्याला कळले की, त्याचं 'तिचं' प्रेम होतं. आणि हे 'तिच्याच' कडून कळलं होतं! लग्न झालेल्या तिचाच विचार हिच्या रोमरोमी अधिकार गाजवत असतो हिला कळल्यापासून. खरे तर ह्याला जागेवरून स्वतः इंचभरही हलता येत नाही.' आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनात इतर कोणी नसावाच असा जालीम विचार असणं हेच स्त्री मनाचे सनातन सत्य आहे.' याची हिनी तसल्याच पुरुषी मानसिकतेला जाणीव करून दिली. 
५) आत-बाहेर 

हॉलमध्ये आता कुणालाच झोपायला जागा नाही म्हणून आतून कुणीही दरवाजा उघडायला तयार नाही. उलट बाहेरच्या आत येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांना आतले शिव्या देत, त्यांची संभावना करतात. बाहेरचे आत मधील पाहुण्यांना. केशव कसा बसा आत शिरतो. बाहेर असताना आतल्या पाहुण्यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या केशवचे वागणे १८० अंश कोणात बदललेले असते. ह्यालाच विचार परिवर्तन म्हणतात का? 


-मनोज बोबडे

गुरुवार, १९ जून, २०२५

प्रतीकात्मक छायाचित्र 







नजरेत तुझ्या 

तुझ्या कायेतून। 
चंदनाचा वास। 
येताना उल्हास। 
मनात या ।। 

नजरेत तुझ्या। 
ओलीचिंब माया। 
बंधनाची रया। 
फुलापरी।। 

पिलासाठी जशी। 
झुरतसे घार। 
तुझी ही नजर। 
माझ्यासाठी।। 

-मनोज

मंगळवार, १७ जून, २०२५

प्रतीकात्मक छायाचित्र 

 

तू अशी गोड हसतेस – कविता

हसू

– मनोज बोबडे
तू अशी गोड हसतेस आणि माझ्या मनाच्या रुक्ष खोडाला जीवनाची कोवळी, मनभावन पालवी फुटू लागते. फुलते निर्भ्रांत होऊन, बहरते जगण्याच्या उत्कट सदिच्छेने लगडतात त्याला फळे रक्तातील रोमांच वाढविणाऱ्या जीवनदायी रसायनाची... फळातील बीजे पेरत जातात उल्हास, उमेद, उत्साह वगैरे तेव्हा तयार होत असतात रोमारोमात पर्यावरणीय व्यवस्थेचे संदर्भ.. सर्वत्र जीवन उगण्यासाठी! मग तूच सांग, तुझ्या हसण्याचे झाड एवढे असरदार असेल तर तू मनःपूर्वकपणे खळखळून हसायला नको का?

शुक्रवार, १३ जून, २०२५

लग्नाचा सुवर्णं उत्सव

 
२३ मे १९७५ रोजी झालेल्या लग्नाला २३ मे २०२५ रोजी ५० पूर्ण झाले.आई-बाबांच्या या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता.
२३ मे १९७५ रोजी झालेल्या लग्नाला २३ मे २०२५ रोजी ५० पूर्ण झाले.आई-बाबांच्या या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता. 















 
बाप बापावानी असे 
माय असे मायेवानी 
हीनी गायिली तयाची 
त्याने हिची सदा गाणी 

असे असो तसे असो 
वेडे वाकडे असू दे 
जिथे तृप्तीचे गाठोळे 
दृष्ट त्याकडे असू दे 

हाच प्रण धरुनीया 
रुजूवात प्रवासाची
सज्ज चालाया जाहले 
वाट कटू संसाराची

वरिष्ठांनी बांधल्या या 
गाठी ऋणानुबंधाच्या 
नाते आत्याच्या मुलाशी 
जुळे मुलीशी मामाच्या 

दबावात का असेना 
नाते चालले प्रदीर्घ 
सालं इतके लोटले 
पुढे साताचाही वर्ग 

अशा संगतीने आज 
किती डहाळ्या फुलल्या 
मुलं बाळ नातवंडे 
कळ्या बहरास आल्या 

आज कळ्या, फुले जमा 
झाली सुगंध पेरण्या 
पन्नासाव्या सालाचा या 
स्वर्ण सोहळा करण्या

-मनोज बोबडे 

वर्षा ऋतू पर हिन्दी बालकविता

  प्रतीकात्मक इमेज वर्षा ऋतू वर्षा ऋतू आया है बारीश ने गीत गाया है नभ के आंगण मे देखो काली काली छाया है चल राजू चल पिंटू चल भिगते है पानी म...