शुक्रवार, १३ जून, २०२५

लग्नाचा सुवर्णं उत्सव

 
२३ मे १९७५ रोजी झालेल्या लग्नाला २३ मे २०२५ रोजी ५० पूर्ण झाले.आई-बाबांच्या या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता.
२३ मे १९७५ रोजी झालेल्या लग्नाला २३ मे २०२५ रोजी ५० पूर्ण झाले.आई-बाबांच्या या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता. 















 
बाप बापावानी असे 
माय असे मायेवानी 
हीनी गायिली तयाची 
त्याने हिची सदा गाणी 

असे असो तसे असो 
वेडे वाकडे असू दे 
जिथे तृप्तीचे गाठोळे 
दृष्ट त्याकडे असू दे 

हाच प्रण धरुनीया 
रुजूवात प्रवासाची
सज्ज चालाया जाहले 
वाट कटू संसाराची

वरिष्ठांनी बांधल्या या 
गाठी ऋणानुबंधाच्या 
नाते आत्याच्या मुलाशी 
जुळे मुलीशी मामाच्या 

दबावात का असेना 
नाते चालले प्रदीर्घ 
सालं इतके लोटले 
पुढे साताचाही वर्ग 

अशा संगतीने आज 
किती डहाळ्या फुलल्या 
मुलं बाळ नातवंडे 
कळ्या बहरास आल्या 

आज कळ्या, फुले जमा 
झाली सुगंध पेरण्या 
पन्नासाव्या सालाचा या 
स्वर्ण सोहळा करण्या

-मनोज बोबडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रबोधन

प्रतीकात्मक    वैचारीकतेचा अभाव माणसाला गुलाम करतो!                   अतिशय श्रध्दाळु, धार्मिक आणि देववादी लोकांचा या गोष्टींवर विश्वास बस...