पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पावसासवे!

इमेज
  गीत एक गाईले मी पावसासवे वाटते असेल ही नभाची आसवे सौख्य जाहले असे की दुःख अंबरा कळेच ना असे कसे मनास भासवे शांत जाहली तरु ही हर्ष पावली एकजीव जाहली सर्वत्र सावली हासला हा आसमंत धुंदशा गुणे लाजली जी द्वाड खुळी लाही कावली आज लाभला जीवा नवाच गारवा का न खगांचा दिसे नभात ‘कारवॉं’! असतील पाखरे अधि घरास परतली तरारल्या रानचा तो रंग हिरवा सडक डांबरी चकाके न्हाउनी जळी रंग लेउनी जणू देहास काजळी आणि निवासे चिंब ही प्रसन्न जाहली ‘कोण ओती अमृताच्या वरून ओंजळी?’ भिजशी तिथे तू मी इथे तो रंग पाहिला भाव खुळा तो जणू अभंग राहिला अनमोल हे निमिष सखी कोण पळविते? पूस पावसास जो अरंग राहिला -मनोज बोबडे (‘परिमळ’ या संग्रहातून)

व्हिलचेअर ’ चा हुंकार

कवी मनोज बोबडे यांचा व्हीलचेअर हा ६३ कवितांचा सुंदर संच आहे. ‘वत्स-विनायक प्रकाशन’ पुणे, नागपूर द्वारा तो प्रकाशात आला आहे. प्रख्यात चित्रकार श्री अरुण मोरघडे ह्यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. खगोलीय ऋतुचक्री रंगाकृतीद्वारे ‘व्हीलचेअर’च्या पार्श्वभूमीवरील गती, व्याप्ती व विशाल जीवनार्थ प्रकट करणारा भव्य चित्राविष्कार आहे. हे आविष्करण आतील काव्यात्म आशयाला पूरक ठरले आहे. सोबतच या काव्यसंग्रहातील ५७व्या ‘मी जळावानी’ या कवितेतील चार ओळी अंकित करून आयुष्यरूपी वाहत्या नदीच्या जीवनात डबक्याप्रमाणे कुठेच साचून न राहता वाहत राहून ग्रंथातीत नैसर्गिक काव्यानंद अनुभवण्याचा संदेश देण्यात आला आहे. एकंदरीत मुखपृष्ठ ही वाचक रसिकांची आतील कविता वाचण्याची जिज्ञासा तीव्रतेने जागृत करते. मुखपृष्ठाप्रमाणे मलपृष्ठही खूप काही सांगून जाते. मलपृष्ठावरील कवी मनोज बोबडेंचे रंगीत छायाचित्र त्यांचे व्यक्तिमत्व प्रकट करते पण महत्वाचे म्हणजे महाकवी सुधाकर गायधनी व महान विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे ह्यांची व्हीलचेअर काव्यकलेबाबतची गौरवपर प्रशस्तीपत्रे आहेत. यामुळे वाचक रसिक हा कविता संग्रह वाचण्यास एकदम आतुर होतो आती

कुठवर राखावे भोळेपण?

देव-देवतांच्या आधारे — फलज्योतीष्याचे बळ सारे | दुकान थाटून बसले कोणी — स्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी | गुलाम होईल ऐशा ज्ञाना — जनतेमध्ये पसरविताना | लाज मुळी मानसी न काही — फक्त हित अपुलेच पाही |     किती आजवर केले भाकीत — वेळ ती येता बसले झाकीत | भाकीत खोटे ठरते जेव्हा — करी सारवा-सारव तेव्हा | भीती कशाला जनी पसरवी — स्वतःस का ते असे घसरवी | खोटे-नाटे सांगून येथे — घरी तुंबडी भरून नेते | मुर्ख जाणोनी जनतेला का — देत चालले सदाच धोका | सुज्ञ येथली जनता होता — सुख-दुःखाच्या करती बाता | त्या आधारे बसते घोकीत — श्रद्धा अपुली असते राखीत | शब्दमय जंजाळाचे ते — जनतेवरती जाळे टाकते | निराश इथली भोळी जनता — शरण जातसे हा हा म्हणता | अज्ञानाची हीच परिणती — अशी घडविते सदा अवनती | व्हा व्हा जनहो जागे आता — नको राहणे मागे आता | कुठवर राखावे भोळेपण — स्वत्व आपुले इथे गमावून | अस्मितेची कास धरा रे — बाणेदार हे जीणे करा रे | कशास पोथी हवी खुळी ती — जी देते जीवनाला गळती | आणिक त्यांचा कशास मक्ता — शोषित जाईल तुमच्या रक्ता |

हीच खरी नीती ....

इमेज
मती-नीती-गती-वित्त गेले विद्येविना दिला मंत्र ज्योतीबाने मतलबाविना तयासाठी कुणाच्याही मुखी नाही गाणी जयामुळे झाला हरजीव स्वाभिमानी भेदाभेद प्रस्थापित करी त्याचा मान ठेवी, करी मेंदूतील ज्ञानाचे पतन ज्योतीबास राष्ट्रद्रोही म्हणतात ‘भिडे’ असे वळवळ करी ‘मनोहर?’ किडे त्यांचे इथे शब्द ज्यांनी प्रमाण मानिले मेंदू-मने सारे त्यांचे रसातळी गेले अशा गुरुजना काय मान-पान द्यावा? आदरास त्यांच्या एक पुरे ती खडावा  नीती अशी भ्रष्ट , बडेजाव श्रेष्ठतेचा   म्हणे ' द्रोही ' त्यांना , सत्य ज्ञान सांगे वेचा! अशा नरा माराव्यात पैजारा अनेक   अरे गड्या हीच खरी नीती आहे नेक!   -मनोज बोबडे (डिसेम्बर२००७) ¼ आज ११ एप्रिल क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या निमित्य विनम्र अभिवादन! त्या निमित्यानेच ही एक कविता ½

किंमत,

कुसुमास भाव मोठा गंधास ना कहाणी पद्यच श्रेष्ठ जेथे काव्यास कोण मानी? कृत्रिमता कशी ही नांदावयास पाहे टरफले हासती अन् गाभा झुरून राहे प्रतिभा उणी कशी ही वाहे वेड्याप्रमाणे कीर्तीस हपापल्यांचे असती कैक बहाणे -मनोज बोबडे ('परिमळ' या कविता संगहातून)

ग्रंथ आणि तत्वज्ञान

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे , की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा ; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही , आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर. ..... एक तर धर्म , ईश्वर , पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.   पूर्वजन्म , पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही .   देव , धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत , याविषयी

साधेपणामुळे

साधेपणामुळे सारा घात झाला, घात झाला कधीतरी नाही गड्या माझा दिनरात झाला हाही सांगे तोही सांगे कर असे, कर तसे प्रेम-विश्वासाच्या बळे मला लागलेले पिसे करू जाता सांगितले दुसरा ये सांगण्यास दोन्ही रिती करावया बाधा येई वागण्यास मग सारे नियोजन कोलमडूनिया पडे तेव्हा यशतेचे माझ्या निघतसे धिंडवडे म्हणुनीच सांगणे हे ‘साधेपण सोड मन्या शिस्त सदा राख ऐकू-नको परक्याचे कुण्या! ऐकताना जाण ठेव सत्य, न्याय, बंधुतेची अन सांगणाऱ्या इसमाच्या प्रामाणिकतेची’ -मनोज बोबडे 

आई आणि बाळ

इमेज
लाडीक लाडीक बाळ हासती हर्षित आई मनी खास ती पाहून म्हणती राजा हा गोड सानुला माझा हा! रम्य खेळणे हाती घेणे हलवून झुलवून फेकून देणे मस्तीत रमती राजा हा गोड सानुला माझा हा! टकमक बघती नैन टीमुकले फुरफुर करती ओठ चिमुकले खेळ कैक करी राजा हा गोड सानुला माझा हा रंग सावळा सुंदर सुंदर चोर भामटा बडा बिलंदर जणू विदुषक राजा हा गोड सानुला माझा हा रडतची बघता गोड फुले ओठांवरती हास्य झुले फुलच होतो राजा हा गोड सानुला माझा हा मनोज बोबडे 

माशी

रडू नको गीडू नको बाई तू अशी अग् तुझ्या नाकावर बसली माशी रडशील तर ती चावेल तुला थांब तशीच अग् पकडू तिला माशी मारायला मी मुठ बांधली बुक्की मारता ती माशी उडून गेली हाताची या बुक्की तुला फार लागली नाकातली अळी धाऊन बाहेर आली आणि अळी सर्रकन ओढवली आत दिसू नये म्हणून नाकी ठेवला तू हात झाली बघ बाळा अशी माशीची या मात अन् दिसू लागे तुझे पांढरे ते दात मनोज बोबडे