पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रंथ आणि तत्वज्ञान

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे , की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा ; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही , आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर. ..... एक तर धर्म , ईश्वर , पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.   पूर्वजन्म , पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही .   देव , धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत , याविषयी

साधेपणामुळे

साधेपणामुळे सारा घात झाला, घात झाला कधीतरी नाही गड्या माझा दिनरात झाला हाही सांगे तोही सांगे कर असे, कर तसे प्रेम-विश्वासाच्या बळे मला लागलेले पिसे करू जाता सांगितले दुसरा ये सांगण्यास दोन्ही रिती करावया बाधा येई वागण्यास मग सारे नियोजन कोलमडूनिया पडे तेव्हा यशतेचे माझ्या निघतसे धिंडवडे म्हणुनीच सांगणे हे ‘साधेपण सोड मन्या शिस्त सदा राख ऐकू-नको परक्याचे कुण्या! ऐकताना जाण ठेव सत्य, न्याय, बंधुतेची अन सांगणाऱ्या इसमाच्या प्रामाणिकतेची’ -मनोज बोबडे