विचारधन
संदर्भ- सुनिता देशपांडे (प्रिय जि.ए.)
- विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलीत समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही.
- सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आवाज कधी बुद्धया तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलन शक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे म्हणजे विवेक.
- प्राण्यांना माणसाळवण्या पेक्षाही महत्त्वाचा होता शेतीचा शोध. मात्र या शोधापायी धर्मांमध्ये रक्तरंजित रूढींचा शिरकाव झाला व शतकानूशतके त्या रुढी सुरू राहिल्या.
- इतिहास पूर्व काळातील सर्वात शेवटची महत्त्वपूर्ण नवनिर्मिती म्हणजे लेखन कला.
-बर्ट्रान्ड रसेल
आपल्याकडची ऊर्जा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याची भीती लोकाना का वाटते आहे ? जीवाश्म इंधनाचे उपलब्ध साठे संपले, तर येणाऱ्या भयावह संकटाचा इशारा का दिला जातो आहे? जगात ऊर्जेची कमतरता नाही हे स्पष्ट आहे. आपल्या गरजांप्रमाणे तिचं रूपांतर करून ती कशी उपयोगात आणायची याबाबतच्या ज्ञानाची फक्त कमतरता आहे.....
सूर्य जी ऊर्जा रोज फुकटात देतो, त्या ऊर्जेशी संगळ्या जीवाश्म इंधन साठ्यांमधून मिळणाऱ्या ऊर्जेची तुलना करता; या साठ्यांमधली ऊर्जा नगण्य आहे. सूर्याच्या ऊर्जेचा एक लहानसा अंश पृथ्वीवर पोहोचतो. सूर्याची संपूर्ण वर्षभराची ऊर्जा मोजली, तर ती *३७,६६,८०० एक्झाज्यूल इतकी भरते. (ज्यूल हे ऊर्जेचं मेट्रिक मोजमापातलं एकक आहे. एक ज्यूल म्हणजे एक छोटं सफरचंद एक मीटर उंच उचलण्यासाठी लागणारी ऊर्जा. एक एक्झाज्यूल म्हणजे एक बिलिअन ज्यूल्स होतात.)* जगातल्या सर्व वनस्पती मिळून प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे फक्त तीन हजार एक्झाज्यूल्स ऊर्जा बंदिस्त करतात. *सर्व मानवी कृती आणि उद्योगधंदे मिळून दरवर्षी पाचशे एक्झाज्यूल्स ऊर्जेचा उपयोग करतात. पृथ्वी सूर्याकडून तितकीच म्हणजे ५०० एक्झाज्यूल्स ऊर्जा फक्त ९० मिनटांमध्ये मिळवते.*ही केवळ सौरऊर्जा झाली. याच्या जोडीला आपल्या भोवताली अणुऊर्जा, गुरुत्वाकर्षण शक्ती यांसारखे इतर प्रचंड ऊर्जास्रोत आहेत. त्यांपैकी गुरुत्वाकर्षणातून निर्माण होणारी ऊर्जा चंद्राच्या पृथ्वीवर होणाऱ्या आकर्षणामुळे समुद्रावर येणाऱ्या भरतीओहोटीतून अगदी स्पष्ट होते.
(संदर्भ :- सेपिअन्स - ले. युवाल नोवा हरारी )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा