शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

विचार धन

 -- निसर्गात भरभर जे जे घडतं तेथे साधारण समप्रमाणात घडत असतं. या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव, ना व्यक्तिमत्व. त्यामुळे तुम्हाला व्यक्तिशः खुश किंवा नाखूश करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात. त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात एवढंच. आपल्याला त्यात चांगल्या किंवा वाईट कशाही वाटो आपल्या वाटण्यामुळे घटिताची वारंवारता बदलत नाही. हे पचणं खूप कठीण आहे.......

- द गॉड डिल्युजन


 योग्य शिक्षण आणि प्रगल्भ विचारांना प्रोत्साहन हे डॉकिन्सच्या मते धर्ममताला आणि अगदी बाल वयातच केल्या जाणाऱ्या धार्मिक ब्रेन वॉशिंगला नेस्तनाबूत करण्याचे दोन नामी उपाय आहेत.


- जादुई वास्तव


'धर्माविना विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आइन्स्टाईनचे उद्धृत फार उत्साहाने अनेकवार ऐकवले जाते; पण आइन्स्टाईन हेही सांगितले होते की,


माझ्या धार्मिक निष्ठांसंबंधी तुम्ही जे काही ऐकलेत ते अर्थातच असत्य आहे, पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेले असत्य. माझा देवावर विश्वास नाही आणि हे मी कधीही नाकारलेले नाही, उलट अतिशय स्पष्टपणे मी ते सांगत आलो आहे. धार्मिकता म्हणता येईल असे काही माझ्यात असलेच तर ते म्हणजे आपल्या विज्ञानाने उलगडून दाखवलेल्या विश्वाच्या रचनेबद्दलचे अमर्याद कौतुक.


आइन्स्टाईनच्या शब्दांत विसंगती वाटते? हे शब्द दोन्ही बाजूंनी वापरता येतील असे वाटतात? नाही. धर्म हा शब्द ज्या रूढार्थाने वापरला जातो त्यापेक्षा अगदी, संपूर्ण वेगळ्या अर्थाने आइन्स्टाईनला इथे तो अभिप्रेत आहे. पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेला धर्म आणि आइन्स्टाईनचा धर्म यातला फरक मी विशद करत असताना वाचकांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवावी की. मी केवळ 'पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेल्या ईश्वर कल्पनेलाच भ्रामक म्हणतो आहे.


-रिचार्ड डॉकिन्स


संसाधनांचा अभाव असणं म्हणजे पारिस्थितिकीचा ऱ्हास नाही...... मानवजातीसाठी उपलब्ध असणारी संसाधनं सतत वाढत आहेत आणि ती तशीच वाढत राहण्याची शक्यता आहे; म्हणूनच साधनस्रोतांच्या तुटवड्याच्या तर्कातून केली जाणारी जगाच्या भविष्याबद्दलची भाकितं अस्थानी ठरण्याची शक्यता आहे. याउलट पारिस्थितीकीय ऱ्हासाची भीती भक्कम पायावर उभी आहे. भविष्यात माणूस वेगवेगळ्या नव्या पदार्थांवर आणि ऊर्जास्रोतांवर नियंत्रण मिळवेलही. मात्र त्याच वेळी त्यानं वनस्पति-प्राण्यांची उरलीसुरली नैसर्गिक मूलस्थानं उद्ध्वस्त केलेली असतील. त्यातून इतर बहुसंख्य प्रजाती कायमच्या नष्ट होतील....


३७५/ सेपिअन्स


... माणूस एकीकडे देवाला सर्वज्ञ समजतो. सर्व शक्तिमान समजून त्याची पूजा करतो. दुसरीकडे स्वतःस सोयीस्कर अशी कृत्ये देवाच्या दृष्टीने करता येतात, असे समजून देवाच्या सर्वज्ञतेला कमी सुद्धा लेखतो. एकीकडे ईश्वर सर्वांचे रक्षण करतो असा ओरडून ओरडून प्रचार करतो, त्याचवेळी आपल्या शत्रूंचा नायनाट करून देवाने आपल्यालाच कसे वाचवले, याचे दाखलेही देतो.


-बर्ट्रान्ड रसेल


- लोकशाही प्रणालीचा उगम हा शासकीय यंत्रणा आणि स्वातंत्र्य यामध्ये मेळ घालण्याचे साधन म्हणून झाला. एक बाब नक्की, की संस्कृती म्हणून घ्यायला लायक असे काहीही अस्तित्वात यायचे असेल, तर त्यासाठी शासन यंत्रणा अस्तित्वात असणे गरजेचे असते. परंतु इतिहास वारंवार दाखवून देतो, की ज्या लोकांना इतर लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळतो, ते संधी सापडताच मिळालेल्या सत्तेचा निर्भपणे गैरवापर करतातच.


-बर्ट्रान्ड रसेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विचार धन

  -- निसर्गात भरभर जे जे घडतं तेथे साधारण समप्रमाणात घडत असतं. या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव, ना व्यक्तिमत्व. त्यामुळे तुम्हाला व्यक्तिशः ...