ग्रंथ आणि तत्वज्ञान


बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.
.....एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.


पु. ल. देशपांडे (’एक शुन्य मीया पुस्तकातुन)


या देशाचा पूर्वीचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्ष ब्राम्हणवर्ग व बुद्ध धर्म यांचा वाद चालू होता. या वादात जे वांगमय निर्माण झाले धाकर्मक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ताकेंद्रावर आपली हुकुमत चालावी म्हणूनच ‘’गीता’’ या ग्रंथाचा जन्म झाला.

वेदातील थोडाफार अनुवाद गीता ग्रंथात करण्यात आला आहे. परंतु वेडात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे ? खरे पाहिले तर वेद दोनच आहेत. एक ऋग्वेद आणि दुसरा अथर्ववेद. मी कितीतरी वेळा वेद वाचले आहेत. त्यात समाजाच्या मानवाच्या उन्नतीसाठी व नितीम्त्तेस पोषक असे काहीही सांगितलेले नाही.

अथर्ववेदात बायको प्रेम करत नसली तर काय करावे ? दुसऱ्याची बायको कशी वश करावी ? द्र्व्यहरण कसे करावे? हे सांगितले असून जारणमारण आदी गोष्टींचाही समावेश आहे. वास्तविक वेदांसारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती ?

यातील पुरुषसूक्तात ब्राम्ह्नांपासून शूद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याबाबतच कटाक्ष होता व त्याच दृष्टीने त्याने चातुर्वर्ण्याबद्दल टीका केली आहे.क्षत्रियाने मारणे हे त्यांचे कर्तव्य आहे अस सांगितलं आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरुरीही असू शकेल.पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात १८ व ३९ श्लोकांत वेदांताचा आधार घेऊन आत्मा अविनाशी आहे , देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच असे विवरण केलेले आढळेल परंतु विचार करा की, ‘’एखाद्य खुनी खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की ,”साहेब आत्मा अविनाशी आहे तेव्हां खुनाबद्दल आरोपीस का शिक्षा करता ?’’ तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल ?

परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकांतून शूद्रांची निंदा अवहेलना करण्यात आली आहे. यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल,ते कायमचे दलित राहतील अशी योजना करण्यात आली आहे.ती पुस्तके जर तुम्ही आम्हास धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माण अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही.हे माझे एक जीवनकार्य आहे. खालच्या लोकांना निःसंतान करण्याचा , त्यांना कायमचे पायदळी तुडवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याकरिता पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग (ब्राम्हण) जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर(‘वेद आणि गीता’या विषयावरील भाषणाचा अंश)









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...