काही श्लोक २


कृतीचा दिसे पुढती अंजाम जेव्हा
नसावा अचंबा नसो नवल तेव्हा
करावे मनन वेडी चिंता हरावे
जळाकारणे रोप बहरून यावे

             अतर्क्य परामानसी गुंतलेला
             कुठे राखतो न्याय तो बंधुतेला
             तयाला गमे धर्म उन्माद नीती
             सले साम्य त्याला चळे गोड प्रीती                    


जिथे संशयाला नसे निमिष थारा 
तिथे ज्ञानवंता मिले हा किनारा 
सुचे प्रश्न ना, नच उभे तर्क राही
परीघापुढे ना फुले ज्ञान काही 

मनोज बोबडे..'वेध अम्बराचा' मधून....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐक जरा साजणे...

तुझ्यामुळे

सांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”